Bhagat Singh
’मी नास्तीक का आहे’ हा भगतसिंहाने लिहिलेला प्रसिद्ध निबंध आहे, जो त्यांनी लाहोर जेलमध्ये असताना १९३० मध्ये लिहिला होता. हा निबंध त्यांच्या सर्वांत चर्चित आणि प्रभावशाली कार्यापैकी एक आहे. या पुस्तकात भगतसिंहाने ईश्वराच्या अस्तित्त्वावर तार्किक पद्धतीने प्रश्न केले आहेत. ते धर्म, अंधविश्वास आणि सामाजिक कुप्रथांची देखील ते नोंद घेतात. भगतसिंहाचे मत होते की ईश्वराचा शोषण आणि अन्यायाला योग्य ठरविण्यासाठी उपयोग केला जातो. ते एक न्यायपूर्ण आणि समान समाज निर्माणावर विश्वास ठेवत असत. जिथे ईश्वराच्या अवधारणेची आवश्यकता नव्हती. याला सरळ आणि स्पष्ट भाषेत लिहिण्यात आले आहे, जे त्याला सामान्य जनेतसाठी सोपे बनवते. भगतसिंहांनी त्यांच्या शब्दाला प्रभावशाली पद्धतीने व्यक्त करण्यासाठी तर्क, उदहारणं आणि उपमेचा उपयोग केला आहे. त्यांचे लेखन भावनीक आणि प्रेरक आहे, जे वाचकांना प्रेरित करतं. ’मी नस्तीक का आहे’ हा निबंध भगतसिंहांच्या साहित्यिक आणि क्रांतीकारी वारशाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. हे एक असे पुस्तक आहे जे वाचकांना विचार करायला, प्रश्न करायला आणि एक आदर्श समाज निर्मितीसाठी प्रेरित करते.